"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण" श्रध्दा म्हटल्यावर आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.आपण आपल्या देवावरती,आई-वडीलांवरती खुप श्रध्दा ठेवून असतो,थोडा विचार करा.खरच प्रामाणिक आपण श्रध्दा ठेवतो का?स्वतःच्या मनाला विचारा. आजच्या नवयुगात श्रध्दा/विश्वास काय असते तेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत.देवावरती असणारी श्रध्दा सुध्दा मोह,लालसा,लोभा पोटी ठेवली जाते.आई-वडीलांच्या बाबत ही असेच काही से आहे.नक्की श्रध्दा काय हेच आपल्याला माहिती नाही.फक्त त्याचा अर्थ आपण जाणतो पण प्रत्यक्षात उतरवत नाही.ज्या वेळी श्रध्दा समजेल तेंव्हा वयोवृध्द आश्रम बंद झाल्या शिवाय रहाणार नाहीत.आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्यासाठी श्रध्दा काळाची गरज आहे. श्रध्देची लक्षणे दोन प्रकारे आहेत,एक प्रसन्नता व दूसरी महत्वकांक्षा,आज आपल्याकडे प्रसन्नता आहे का?या धावपळीच्या युगात प्रसन्नताच आपण विसरून गेलेलो आहोत.चेहऱ्यावर दाखवताना माञ प्रसन्न/आनंदी चेहरा दाखवतो माञ मनाच्या/मेंदूच्या गाभाऱ्यात तणाव युक्त स्थिती असते,युध्दस्थिती असते,आपण समोरच्याला तर आनंदी असल्याचा भास करून फसवतोच पण स्वतः ला सर्वात ...