*मानसिक तणाव,चिंता,रक्तदाबास,
अनापानसती ध्यानाची गरज*.
आज आपल्याला शांततेची गरज असूनही आपण शांत रहाण्याचा प्रयत्न करत नाही.कारण आपल्या व्यस्त जीवनातून बाहेर डोकावून पहाण्यास वेळ मिळेनासा झाला आहे.याचातुनच मानसिक तणाव,चिंता,रक्तदाब,सारखे अनेक भस्मासुर आपले जीवन भस्म करण्यास पहात आहेत.या भास्मासुरांवर विजय मिळवायचा असेल तर शांततास्तिथी गरजेची आहे.आज प्रत्येकाला रक्तदाब,सारख्या विकृतीने ग्रासून टाकले आहे.जिकडे जाईल जाईल तिकडे रक्तदाब असणार्या सरास व्येक्ती पहायला मिळतायत.याचे मुळ म्हणजे मानसिक तणाव,चिंता,
रक्तदाब,असणार्या प्रत्येक व्येक्तीला महिना,पंधरा,दिवसांनी हॉस्पिटलची चक्कार मारावी लागते.सतत गोळ्यांचा बदल करावा लागतो.याला तर व्यक्ती वैतागल्या आहेत.कालच मला एक ओळखीचे ग्रस्त हॉस्पीटल मध्ये भेटले,मी सहज त्यांना विचरले आज इकडे कसे काय,कोणी आजारी आहे का?.मी विचारताच त्यांनी बोलायला सुरवात केली,गेली ३० वर्षापासून महिना,दिडमहिण्यातून डॉ.देशपांडे यांचाकडे रक्तदाब साठी गोळ्या चालू आहेत.सकाळ,संध्याकाळ न चुकता गोळ्या घ्याव्या लागतात.कंटाळाआलाय आता या गोळ्यांचा पण पर्याय नाही.रक्तदाब काही पाठ सोडत नाही.कालच डॉक्टरांना भेटायला गेलो पण ते आता परदेशी मुलाकडे गेले आहेत.माझ्या गोळ्या हि संपल्या आहेत.नातेवाईकानी या डॉक्टरांचे नाव सुचवले म्हणून आलो आहे.पाहू आता काय सांगतात,त्याच गोळ्या घ्यायचा कि पुन्हा बदलून घायचा ते,३० वर्ष म्हणजे झाले काय.या ३० वर्षात ते देवाला एखाद्या वेळी नमस्कार करायला विसरेले असतील पण गोळ्या घ्यायला मात्र विसरले नाही.किती तणाव मुक्त जीवन याचातून बाहेर पडण्यासाठी आज आपल्याला अनापानसती ध्यानाची खूप गरज आहे.
आपल्या मनामध्ये अनेक विचारांचा/भावनेचा गोंधळ उडतो,युद्धस्थिती निर्माण होते. तेव्हा आपल्या रक्तातील blood lactate नावाचे रसायन वाढते,तेव्हा मानसिक तणाव,चिंता,रक्तदाब,वाढतो.याच्या विरुद्ध ध्यानाने हे प्रमाण कमी होते.श्वासाची गती मंदावते,स्नायू रिल्याक्स होतात.रक्तदाब कमी होतो.ऑक्सिजनचा वापर कमी होतो.व ध्यानाने रक्तातील lactate कमी होते.मनाला कोणतेही संकट जाणवत नाही.शरीर शांतता स्थितीत जाते,रिल्याक्स होते.म्हणजेच ध्यानाने शरीर व मनाची शांतता स्थिती निर्माण होते.एवढेच नव्हे तर जप,नामस्मरण,करण्याने हि शांतता स्थिती निर्माण होते.असे १९६७ साली झालेल्या संशोधनात डॉ.हर्बर्ट बेन्सन यांना आढळून आले आहे.
मानसिक तणाव असताना,आपले मन,शरीर विचारांच्या गोंधळात आसते.मनाची शरीराची युद्धस्थिती निर्माण झालेली आसते.यातून निर्माण होणार्या आजारातून बाहेर पडण्यासाठी ध्यान एक उपचार पध्दत म्हणून वापरता येईल.असे अनेक प्रयोग डॉ.बेन्सन यांनी केले आहेत.१९७५ साली डॉ.हर्बर्ट बेन्सन यांनी the Relaxation Response हे पुस्तक हि लिहले होते.ते पुस्तक अमेरिकेत लोकप्रिय झाले.टिव्ही,न्यूजपेपर,वरती मुलाखत झळकत राहिल्या.
आपल्यला हि तणाव मुक्त होण्यासाठी वैज्ञानिक अनापानसती ध्यान गरजेचे आहे.
पद्मासन अथवा खुर्ची वरती शांत रिल्याक्स अवस्थेत बसून घ्या.व आपल्या नैसर्गिक श्वासावरती लक्ष ठेवा.आत येणाऱ्या व बाहेर जाणार्या श्वासाचे निरीक्षण करा.श्वास आत व बाहेर जात असताना थंड आहे कि गरम याचा वरती लक्ष ठेवून निरीक्षण करा.श्वास आत व बाहेर येताना जाताना डाव्या नाकपुडीतून येतो कि उजव्या याचे हि निरीक्षण करा.श्वास दोन्ही नाकपुडीतून आत येतो कि बाहेर जातो याचे हि निरीक्षण करा.श्वास स्थूल आहे कि सूक्ष्म याचे हि निरीक्षण करा.डोळे उगड्ल्या नंतर एक मिनिट तसेच शांत बसून रहा.
हे ध्यान प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी करा.आपले आरोग्य सुखी व समृध्द बनवा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
अधिक माहितीसाठी व ट्रेनिंग साठी संपर्क करा व
आपल्या प्रतिक्रिया जारूर कळवा.
राहुल दळवी
माईडफुलनेस थेरपिस्ट व ट्रेनर
वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक.
07066217153





Comments
Post a Comment