Skip to main content

फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स

फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स

        आज आपण एक महत्वाचा विषय पाहणार आहोत.आपल्याला युध्द हा शब्द परिचित आहेच,यालाच आपण आणीबाणीची स्थिती तर आजकाल सर्जिकल स्ट्राईक असे ही आपण बोलत असतो.हे शब्द आपल्या कानावरती पडले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर रणगाडे,बंदूक,सैनिकांची तुकडी  डोळ्यासमोर उभी रहाते. पण या गोष्टी एवढ्या वरती थांबत नाहीत आपले रक्त सळसळ करत असते,छाती भरून येते,अंगावरती काटा उभा रहातो ही एक युध्द स्थितीच असते आपल्या शरीरात निर्माण झालेली.या स्थिती मुळे आपल्यात जोश निर्माण झालेला आसतो. हे कशामुळे होते याचा आपण कधीच विचार करत नाही.तो विचार आजचा या धावपळीचा युगात करणे खूप गरजेचे आहे.

       ही एक बाजू झाली याचीच दुसरी बाजू आपण पाहू.आपण एखादी चूक केली असेल व ती घरी कळली तर आपल्याला ओरडा बसेल ही कल्पना करण्यांनी सुधा आपल्या अंगावरती काटा येतो,घाम फुटतो,छाती धडधडते,रक्तदाब वाढतो,अशा अनेक कल्पना आपण सतत करत असतो.आणि शरीर मेंदू मध्ये आपण युध्दस्थिती निर्माण करून घेत रहातो.
     वही युद्धस्थिती आपल्या कल्पनेमुळे निर्माण होते.हा 'फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स'चा परिणाम आहे.

      'फाईट ऑर फ्लाईट रिप्लेक्स' WATTER B. CANNON यांनी १९१५ रोजी वेदना,भय,भूक,क्रोध याचा प्राण्यांच्या वरती होणाऱ्या  प्रतिसादाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द प्रयोग करण्यात आला होता.आणीबाणीचा परिस्थितीतून सुटका करण्यासाठी सर्व सस्तन प्राण्यांच्या शरीरात ADRENALIN चा स्त्राव होतो,या मुळे ऑक्सिजन ची गरज वाढते,त्यामुळे ह्र्दय,श्वासाची गती वाढते,रक्त पुरवठा वाढतो,स्नायू ताठर होतात,चयापचयाची गती वाढते,या मुळे प्राणी लढायला व पाळायला सक्षम होतात.यालाच युध्दस्थिती आणीबाणीची स्थिती म्हणतात. हीच स्थिती आपल्या अनेक कल्पनेमुळे ही सतत निर्माण होत असते,त्यामुळे तणाव वाढतो,मानसिक संतुलन गडबडून जाते.याचातून शांततास्थिती निर्माण करण्यासाठी,

आपल्या शरीर मेंदूला या युध्दस्थितीतून शांततास्थितीत आणण्यासाठी 'रिलॕक्सेशन रिस्पॉन्स'माईंडफुलनेस व कल्पना ध्यान प्रशिक्षण मोलाचे आहे.

              -राहुल दळवी
          माईंडफुलनेस:प्रशिक्षक
           *07066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...