Skip to main content

सजगता व्यसनमुक्ती उपयुक्त

*सजगता ध्यान* *व्यसनमुक्तीचे* *औषध*
  आपण आपल्या आजूबाजूला बरेच दारू पिणारे,सिगारेट फुंकणारे,गांजा,चरस,अशा अनेक व्यसनांनी आहारी गेलेल्या मंडळी पहात असाल.
यातील बहुतेक मंडळी कोणत्या ना कोणत्या तणावामुळे दारू पित असतात.अशा बर्याच मंडळीना विचारले असता टेन्शन असते हो ते घालवण्यासाठी दारू पितो.मला काय हाऊस आहे का? दारू पिण्याची अशी उत्तरे येत असतात.
    नक्की टेन्शन येते म्हणजे काय होते.आपल्या दिवस भरातील कामाचा ताण तर काही संसारीक
तणाव व त्या गोष्टींचा सतत विचार करण्याने आपल्या मेंदू मध्ये युध्दस्थिती निर्माण होते.आपल्या काय करू काय नको असे होते.त्यातून चूकीचे वर्तन घडते.सतत चिड-चिड होते,राग अनावर होतो.काही सुचत नाही समजत नाही.म्हणजेच टेन्शन होय.या मेंदूच्या/मनाच्या युद्धस्थितून शांत होण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो.
या व्यसनांच्या आधाराने काही काळ मेंदू/मन शांत स्थितीत रहाते.काही काळाने पुन्हा आपल्या मेंदूची/मनाची युध्दस्थिती निर्माण होते.ती पुन्हा घालवण्यासाठी आपण व्यसनाचा आधार घेत रहातो.व आपल्या मेंदूला/मनाला त्याची सवय लावून ठेवतो.ती एवढी सवय लागते की तिच्या विना रहाणे अवघड होऊन जाते.यालाच व्यसन असे म्हटले जाते.
    तर काही व्यक्ती कोणताही तणाव नसताना मिञांच्या सोबतीने व्यसनाधीनतेस बळी पडतात.तर काही मंडळी आज एक फॕशन म्हणून व्यसन करता करता व्यसनाधीनतेला बळी पडता.
यातून माञ ना तणाव रहित होतात ना मानसिक संतुलन ठेवतात.यातून शारीरीक विकृती चालू होते.पोटाचे आजार चालू होतात.सिगरेट व तंबाखू मुळे कर्करोग,ह्रद्यरोगास आपण निमंत्रण देतो.तर रक्तवाहिण्या ताठर झाल्याने रक्तदाब वाढतो.
अशा अनेक आजारांना आपण स्वता:हुन निमंत्रण देत आसतो.आपल्या त्या व्यसनाची तलफ झाली की आपण काहीही करूण ते घेतल्या विना रहात नाही.यातून समाजातील ही आपली प्रतिष्ठा धुळीस मिळते.कौटुंबिक कलह वाढतात.आणि आपण एकटेच बाजूला फेकले जातो.यातून ही मानसिकता बिघडते व आपण मनोरूग्ण होऊन जातो.
    यातून सावध रहायचे असेल,मेंदूची/मनाची युद्धस्थिती शांत करूण आपले जीवन आनंदी बनवण्यासाठी माईंडफुलनेस/सजगता ध्यान,आपल्याला आपल्याला विचारांच्या/भावनांच्या युद्धस्थितीतून बाहेर काढणारा एक माञ मार्ग आहे, दारूच्या सिगारेटच्या एका झुरक्याने जी शांत स्थिती अनुभवायची आसते ती आपण काही मिनिटाच्या सजग ध्यानाने स्थिती अनुभवता येते.आपण आपले डोळे झाकून शांत बसायचे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचा स्पर्श जाणायचा याने मनातील विचार काही वेळेसाठी कमी होतात.मेंदू/मनाची युध्दस्थिती निवाळते/शांत होते.याच्या सरावाने आपला मेंदू/मन सजग रहाते व काही कालावधीत आपण व्यसनातून मुक्त होतो.
आपण ही आमची खालील लिंक वापरून माहिती मिळवा
.http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/
व आमच्या "मनाचे आॕपरेशन" आर्थात माईंडफुलनेस/सजगता मध्ये सहभागी होऊन जीवन आनंदी बनवा.
 आपल्या प्रतिक्रिया कळवा.

                 राहुल सिध्दार्थ दळवी
            माईंडफुलनेस थेरपीस्ट व ट्रेनर 
             वैज्ञानिक संमोहन मार्गदर्शक 
                    07066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...