Skip to main content

संमोहन व रिलॕक्सेशन

*संमोहन व रिलॕक्सेशन*
संमोहन सुचना या १००% टक्के मानसिक आजारावरती उपयुक्त आहेत.पण याचा लाभ काही मानसिक समस्या व्यक्तींना,काही काळापूर्ता मिळतो तो तर काही व्यक्तींना पूर्ण काळ याचा लाभ मिळालेला आढळून येत आहे.
*संमोहन सुचना* आपण घेतो म्हणजे नक्की काय करतो.तर आपण आपल्या मेंदूला प्रतिक्रिया देत रहातो.या प्रतिक्रिया वारंवार आपण मेंदूला देत रहातो.त्या प्रतिक्रियांचा प्रतिसाद म्हणून मेंदू काम करतो.
या प्रतिक्रियांचा परिणाम वैचारिक मेंदू वरती होत असावा.पण जेंव्हा या सुचना देणे कमी होत जातील. तेंव्हा पुन्हा-पुन्हा मेंदूत तणाव,डिप्रेशन,भिती चे विचार सतत येत रहातात,या सतत च्या विचारांचा परिणाम अमायग्डाला वरती होऊन युध्द स्थिती निर्माण होते व व्यक्ती मानसिक स्थैर्य गमावू लागतो  मानसिक व मनोरूग्न बनून जातो.
या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रिलॕक्सेशन रिस्पॉन्सची आवश्यकता आहे.



या रिलॕक्सेशन रिस्पॉन्सचे खरे वैज्ञानिक महत्त्व डॉ.हर्बर्ट बेन्सन यांनी करून दिले.१९७५ साली त्यांचे रिलॕक्सेशन रिस्पॉन्स हे पुस्तक हे प्रसिध्द झाले या पुस्तकाने अमेरिका मध्ये खळबळ उडाली व त्यांच्या अनेक न्युज व पेपर वरती मुलाखती झळकू लागल्या.एवढेच नाही तर त्यांनी भारतामधील दलाई लामा यांचा हिमालयातील बौध्द ठिकाणी भेट देऊन संशोधन ही चालू केले.त्या वेळी त्यांना असे आढळून आले की *हिमालयातील* थंड असणाऱ्या ठिकाणी बौध्द भिक्खू आपल्या अंगावरती चिवर(अंग झाकण्याचे कापड)ओले करून ध्यान साधनेला बसायचे काही वेळातच त्यांच्या अंगावरील चिवर सुकून जात,अशा थंड ठिकाणी सर्व साधारण व्यक्ती बसून राहिला तर आजारी पडल्याशिवाय रहाणार नाही.
या वरून कल्पना करण्यांनी सुध्दा मानसाच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रिया घडत असते.असे त्यांच्या ध्यानात आले.
*रिलॕक्सेशन रिस्पॉन्स मुळे मेंदू शांतता स्थितीत जातो.* अमायग्डाला चा विचारांच्या तिव्र प्रतिक्रिया मुळे वाढलेला भाग शांतता स्थितीत येतो.
यातून उच्च रक्तदाब,तणाव नाहीसा होताना आढळून येत आहे.आज संमोहन सुचना महत्त्वाचा आहेतच पण याचा सोबतच *रिलॕक्सेशन रिस्पॉन्स व माईंडफुलनेस याचा वापर केल्यास मानसिक व शारीरिक सौख्य लाभते.*

माईंडफुलनेस प्रशिक्षण घेण्यासाठी संपर्क साधा व आमची अॉडिओ बुक लिंक वापरा.
http://bookhungama.com/Manache-Operation-Session-1/

         श्री.राहुल दळवी.
 माईंडफुलनेस प्रशिक्षक:संशोधक
     
हेल्पलाईन नं:- 7066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...