Skip to main content

मी राजेश्री काळे.....

मी राजेश्री काळे.....


मी एक सोलापुर मध्ये राहणारी एक पारधी समाज्यातील
बाई पारधी समाज म्हंटले की त्याच्या कडे फक्त गुन्हेगार म्हणुनच पाहिले जाते चोर म्हंटले की आमच्यावर शिक्का  मारलेला असतो ... आमच्या पारधी समाज्यामध्ये लहानपणीच  मुलीचं लग्न केलं जात तसेच माझं ही लग्न लहानपणी  करण्यात आलं तेव्हा मी चवथीला  होती ...
लग्न झाल्यावर आम्ही पुण्यात गेलो माझ्या नवऱ्याच्या
घरी हातभट्टी दारू काढण्याची  होती मी तीते दारू काढत होती ....
अश्यातच एक केस मध्ये माझ्या नवऱ्याला पोलिसांनी घेऊन गेले त्यावेळेस मी  चवधा वर्ष्याची होती आणि त्यात मी पोटुशी  होती मला दिवस गेले होते माझा नवरा सुटून  आल्यावर नवरा मला म्हणाला की तुझ्या पोटातील  मुलं माझे नाहीच ... मग तीते जातपंचायत  बोलवली  आमच्या समाज्यात कोर्ट म्हणजे आमच्यातला मुख्य माणुस असतो आणि न्याय   निवाडा करतो मग त्यांनी माझी सत्वपरीक्षा  घेतली पोटात मुलं असुन मला अग्नीतून  मला चालायला लावले एवढा हा आमचा पारधी समाज अंधश्रद्धेमध्ये  गुंतला आहे ... मग मी तीते
रस्त्यावर झाडू मारणे याच काम करू लागली त्यातल्या एक बाईने  मला पाहिले आणि ती संभाळ करत होती मी जे आहे ती त्या बाईमुळेच  अश्यातच ती म्हणाली आपण बचत गट चालू करू पण मी तिला म्हणाली मी आतून खूप दुखी आहे मला रहायला छत नाही पण तिने समजून घेतले तशातच  गिरीश े  परभने सरांची माझी भेट झाली त्यांना मी सर्व हकीकत सांगितली मला शिकायचे आहे हे पण सांगितले त्यांनी मला आबासाहेब  गरवारे  कॉलेज मध्ये शिपाई ची नोकरी दिली ... मी शिक्षण पण चालू केले पण माझ्या पोटात दुसरं मुलं असल्यामुळे मला कोण ऑडिमिशन देत न्हवते मग मला न इलाजाने ते मुलं खाली करावे लागले मग मी पुढचे शिक्षण चालू केले
मी नववी  पास झाली मी शिलाई  मशीन  च पण काम चालू केले अश्यातच मला ढेकणे  सरांची भेट झाली ते भटक्या विमुक्त  जातीसाठी काम करत होते मी त्यांना सांगितले की मला पण आमच्या समाज्यामधील अंधश्र्ध्दा दुर करून शिक्षणासाठी पुढे आणायचे आहे मग मी हळहळू काम करू लागली जातीचे दाखले काडून देऊ लागली मग माझ्या कामाची सुरवात झाली पण झालं असं की मी रात्री कामावरून उशिरा येत असल्यामुळे आमच्या समाज्यामधील लोकांनी मला नावे ठेवायला चालू केली आणि मला नवऱ्याने सोडुन दिल मी दोन दिवस तशीच पुटपाथ  दोन मुलं घेऊन काढली पण तरी ही मी खचुन गेली नाही जिद्द सोडली नाही खचली नाही मी शिक्षण घेत काम करत होती अश्यातच तीते S T साठी आरक्षण जागा निघाली नगरसेविकासाठी  त्यावेळेस माझ्याकडे एवढे पैसे ही न्हवते पण पर्यन्त करून मी आज महाराष्ट्रातील पारधी समाज्यामधली  पहेली नगरसेविका  झाली ... होय मीच ती राजश्री काळे .....

16 . 9 . 2019
                                 राहुल शेंडगे
                                9096998287

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...