"मन करा रे प्रसन्न,सर्व श्रध्देचे कारण"
श्रध्दा म्हटल्यावर आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.आपण आपल्या देवावरती,आई-वडीलांवरती खुप श्रध्दा ठेवून असतो,थोडा विचार करा.खरच प्रामाणिक आपण श्रध्दा ठेवतो का?स्वतःच्या मनाला विचारा.
आजच्या नवयुगात श्रध्दा/विश्वास काय असते तेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत.देवावरती असणारी श्रध्दा सुध्दा मोह,लालसा,लोभा पोटी ठेवली जाते.आई-वडीलांच्या बाबत ही असेच काही से आहे.नक्की श्रध्दा काय हेच आपल्याला माहिती नाही.फक्त त्याचा अर्थ आपण जाणतो पण प्रत्यक्षात उतरवत नाही.ज्या वेळी श्रध्दा समजेल तेंव्हा वयोवृध्द आश्रम बंद झाल्या शिवाय रहाणार नाहीत.आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्यासाठी श्रध्दा काळाची गरज आहे.
श्रध्देची लक्षणे दोन प्रकारे आहेत,एक प्रसन्नता व दूसरी महत्वकांक्षा,आज आपल्याकडे प्रसन्नता आहे का?या धावपळीच्या युगात प्रसन्नताच आपण विसरून गेलेलो आहोत.चेहऱ्यावर दाखवताना माञ प्रसन्न/आनंदी चेहरा दाखवतो माञ मनाच्या/मेंदूच्या गाभाऱ्यात तणाव युक्त स्थिती असते,युध्दस्थिती असते,आपण समोरच्याला तर आनंदी असल्याचा भास करून फसवतोच पण स्वतः ला सर्वात जास्त फसवत रहातो.
या लालसे सोबतच आपण सतत शंका/कुशंका ची सवय माञ मनाला लावून ठेवली आहे,सतत काहीना काही शंका आपल्या मनात चालू आसते,आणि त्यातून निर्माण होतो राग,द्वेष आणि गर्व.मीच शहाना मलाच सगळे येते,माझ्यासारखा दुसरा नाही.अशा अनेक भ्रमा सोबत आपण जगत असतो.आणि त्यातूनच मानसिक समाधान नाहीसे व्हायला सुरूवात होते.
आपण जर श्रध्दा पूर्वक,सजगतेने मनाची अवस्था समजू लागलो तर आपण शांत चित्ताने आनंदाने भरून जातो.सजगतेने श्रध्दा ठेवल्यास मनातील लालसा,मोह,लोभ नाहीसा होतो.मनात कोणत्याही प्रकारची शंका/कुशंका निर्माण होत नाही,कोणा विषयी राग,द्वेष निर्माण होत नाही,गर्व नाहिसा होतो.व आंतरिक व मानसिक शांतता लाभते.हे जेवढे सहज सोपे वाटते.तेवढे आज ते सहज सोपे राहिले नाही.या साठी खुप प्रयत्नांची गरज आहे.ते सर्व प्रयत्न सजगता ध्यानातून आपल्याला साध्य करता येतात.
आपल्या मनाची अवस्था ओळखता येते,व महत्वकांक्षा निर्माण होते.आपले ध्येय गाठण्यासाठी सजग महत्वकांक्षा खुप मोलाची आहे.चला तर मग आज पासून श्रध्दा ठेवून मनाची अवस्था समजू,आनंदी उत्साही जीवन बनवू !
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
7066217153
श्रध्दा म्हटल्यावर आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.आपण आपल्या देवावरती,आई-वडीलांवरती खुप श्रध्दा ठेवून असतो,थोडा विचार करा.खरच प्रामाणिक आपण श्रध्दा ठेवतो का?स्वतःच्या मनाला विचारा.
आजच्या नवयुगात श्रध्दा/विश्वास काय असते तेच मुळात आपण विसरून गेलेलो आहोत.देवावरती असणारी श्रध्दा सुध्दा मोह,लालसा,लोभा पोटी ठेवली जाते.आई-वडीलांच्या बाबत ही असेच काही से आहे.नक्की श्रध्दा काय हेच आपल्याला माहिती नाही.फक्त त्याचा अर्थ आपण जाणतो पण प्रत्यक्षात उतरवत नाही.ज्या वेळी श्रध्दा समजेल तेंव्हा वयोवृध्द आश्रम बंद झाल्या शिवाय रहाणार नाहीत.आपल्या जीवनात मानसिक स्वास्थ्यासाठी श्रध्दा काळाची गरज आहे.
श्रध्देची लक्षणे दोन प्रकारे आहेत,एक प्रसन्नता व दूसरी महत्वकांक्षा,आज आपल्याकडे प्रसन्नता आहे का?या धावपळीच्या युगात प्रसन्नताच आपण विसरून गेलेलो आहोत.चेहऱ्यावर दाखवताना माञ प्रसन्न/आनंदी चेहरा दाखवतो माञ मनाच्या/मेंदूच्या गाभाऱ्यात तणाव युक्त स्थिती असते,युध्दस्थिती असते,आपण समोरच्याला तर आनंदी असल्याचा भास करून फसवतोच पण स्वतः ला सर्वात जास्त फसवत रहातो.
या लालसे सोबतच आपण सतत शंका/कुशंका ची सवय माञ मनाला लावून ठेवली आहे,सतत काहीना काही शंका आपल्या मनात चालू आसते,आणि त्यातून निर्माण होतो राग,द्वेष आणि गर्व.मीच शहाना मलाच सगळे येते,माझ्यासारखा दुसरा नाही.अशा अनेक भ्रमा सोबत आपण जगत असतो.आणि त्यातूनच मानसिक समाधान नाहीसे व्हायला सुरूवात होते.
आपण जर श्रध्दा पूर्वक,सजगतेने मनाची अवस्था समजू लागलो तर आपण शांत चित्ताने आनंदाने भरून जातो.सजगतेने श्रध्दा ठेवल्यास मनातील लालसा,मोह,लोभ नाहीसा होतो.मनात कोणत्याही प्रकारची शंका/कुशंका निर्माण होत नाही,कोणा विषयी राग,द्वेष निर्माण होत नाही,गर्व नाहिसा होतो.व आंतरिक व मानसिक शांतता लाभते.हे जेवढे सहज सोपे वाटते.तेवढे आज ते सहज सोपे राहिले नाही.या साठी खुप प्रयत्नांची गरज आहे.ते सर्व प्रयत्न सजगता ध्यानातून आपल्याला साध्य करता येतात.
आपल्या मनाची अवस्था ओळखता येते,व महत्वकांक्षा निर्माण होते.आपले ध्येय गाठण्यासाठी सजग महत्वकांक्षा खुप मोलाची आहे.चला तर मग आज पासून श्रध्दा ठेवून मनाची अवस्था समजू,आनंदी उत्साही जीवन बनवू !
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
7066217153

छान मुद्देसुद आणि आटोपशीर लेखन...👍👌💐
ReplyDeleteThanks sir
Delete