*वाचाल तर वाचाल*
भाग - २
"मनाचे ऑपरेशन"
या मध्ये आपण पाच मनोवस्था पाहणार आहोत *१)स्पर्श २) मनस्कार(मनाने विषय पकडुन ठेवणे) ३)वेदना ४)सज्ञा (विषयाचे गुणधर्म ओळखणे) आणि पाचवी आहे 5) चेतना* यातील पहिली अवस्था आहे.
*स्पर्श* ही प्रथम अवस्था आहे.ही अवस्था निर्माण होण्यासाठी एकादा विषय आणि चित्त(मन) असायला हवे.तरच ही अवस्था निर्माण होते ती कशी ते पाहुयात.आपले शरीर हे पंच-इंद्रियापासून बनलेले आहे.या पंच-इंद्रियमध्ये मनाचे स्थान आहे.या मनाला स्पर्श होण्यासाठी विषयाची आवश्यकता असते ती या पंच-इंद्रियपासून निर्माण होते.
उदा :- आपण टीव्ही पहात असतो,ती टिव्ही हा झाला विषय,आणि डोळे हे माध्यम त्यामध्ये असते ते चित्त( मन)
म्हणजेच डोळ्यांना चित्तद्वारे टि.व्ही चा स्पर्श होतो.ही आहे आपल्या जीवनाची पहिली सुरुवात.
यासाठी आपले पंच-इंद्रिय मध्ये चित्त(मन) असणे आवश्यक आहे.
समजा जर आपला अपघात झाला असेल आणि आपण कोमा मध्ये असू तर आपले डोळे उघडे असताना ही आपल्याला विषयाचा स्पर्श होत नाही.कारण आपले चित्त(मन) तिथे अस्तित्वात नसते.म्हणूनच आपण जिवंत असणे गरजेचे तरच आपण मनाच्या अवस्था अनुभवू शकतो.
आणि मन हे एकाच वेळी एकच काम करत असते.हे आपण सेमिनार माध्यमातून पाहणार आहोत.
चला तर मग,आज आपण मी सांगितलेल्या विषयाचा अनुभव घेवू.
✒️ राहूल सि, दळवी
माईंडफुलनेस : प्रशिक्षक
____________________________
टीप - *आपल्या शंका नक्की कळवा,तरच हा विषय समजावून घेता येईल.*
Comments
Post a Comment