Skip to main content

तणाव -औदासीन्य वरती माइंडफुलनेस औषध

 तणाव - डिप्रेशन - औदासीन्य वरती

*माइंडफुलनेस(MBT) सजगध्यान उपचार पध्दत.*


माइंडफुलनेस म्हणजे सजगताध्यान याचे संपूर्ण जगभर संशोधन चालू आहे.तर मेंदू तज्ज्ञ ही याचा वरती संशोधन करत आहेत.


आज जर पहायला गेले तर आपण वर्तमान स्थिती मध्ये कमी आणि भूत-भविष्यकाळ मध्ये जास्त रममान होत चाललो आहोत.या मुळे आपण स्वतः हा तणाव स्थिती निर्माण करून घेत आहोत.


भूतकाळ मध्ये घडलेल्या काही प्रसंग(घटना)चा विचार आपण सतत करत आसतो.ती गोष्ट घडून गेलेली आहे.हे आपल्याला समजून ही नसमजल्या करतो व त्या गोष्टींचा अतिविचार सतत आपल्या मनामध्ये चालू असतो.या मुळे आपण औदासीन्य(डिप्रेशन)मध्ये असतो.याचा अतिरेक झाला की आपण मानसिकविकृतीने ग्रासले जातो.तर काही लोक भविष्या मध्ये काय होईल.या विचारामध्ये अडकून पडलेले दिसतात.या मुळे चिंताविकृती निर्माण होते. आपण आजचा आनंद सोडून देतो. उद्याच्या आनंदाकडे पहात असतो.

आजचाच काळ पाहिला तर कोरोना चा काळ चालू आहे.या काळामध्ये कित्येक अनुभव आपल्याला आलेले आसतील किंवा येताना दिसत आसतील.

ज्यांना कोरोना झाला नाही ते या आजाराच्या भितीने चिंता तर करत आहेत.किंवा आपल्या कुटुंबातील अथवा मिञ परिवारातील-समाजातील कोणी ना कोणी तरी मृत झालेले आहेत.या भूतकाळ मध्ये घडलेल्या घटणांचा आपण विचार करून माझ्या बाबतीत तर असे होणार नाही ना या काळजीनेच औदासीन्य मध्ये जगत आहेत.

याचा परिणाम माञ आपल्या मनावरती होवून आजचा वर्तन जगणेच आपण विसरत चाललो आहोत.

जर आपल्याला वर्तनमान मध्ये जगायचे असेल तर आज माइंडफुलनेस(सजगध्यान)याची खुप गरज आहे.

आपल्या औदासिन्य असो डिप्रेशन असो अथवा कोणत्याही गोष्टीचा तणाव असो.यातून बाहेर पडण्यासाठी व योग्य विचार सरणीसाठी माइंडफुलनेस(सजगध्यान)गरजेचे आहे.


या माइंडफुलनेस सराव मधून

▪️आपल्याला क्षणस्थ(एकाग्र)होण्याची सवय लागते.

▪️आपल्या मनामध्ये येणाऱ्या अतितिव्र किंवा सतत चे विचारांची क्षमता कमी होते.

▪️आपली विचारांची नियंत्रण क्षमता वाढते.आपले विचार आपण कोठे ठेवायचे याचे योग्य ज्ञान मिळते.

▪️स्व-चा, व घटणेचा स्विकार करण्याची क्षमता वाढते.

औदासीन्य मध्ये असणाऱ्या व्यक्ती स्वतः हाला अपयशी कुचकामी समजत असतात त्यामुळे ते सतत उदास रहातात.माइंडफुलनेस सराव मुळे येणाऱ्या विचारांना प्रतिक्रिया देण्याची सवय बदलते.या मुळे व्यक्ती स्व चा परिस्थितीचा आजाराचा स्विकार करायला लागते.


मिञांनो आजच्या नवयुगात माइंडफुलनेस एक गुणकारी औषध आहे.


माइंडफुलनेस मानसशास्त्रीय थेरपी(MINDFULNESS BEASED THERAPY) बेसिक व सर्टिफिकेट कोर्स साठी नाव नोंदनी खालील WHATSapp नंबर वरती करा.

7066217153 


🖋️ राहुल दळवी

माइंडफुलनेस प्रशिक्षक:संशोधक 


_________________________

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...