Skip to main content



       
                    
               रंग उधळू सजगतेचे🕺🏻

सवंगड्या सोबत रंगात रंगाने रंगने या सारखा आनंद  कुठे नाही.
आपण ही असेच आपल्या मनाच्या अवस्थेत सतत रंगून जात असतो.एवढे रंगतो की आपण आपले भान विसरून जातो.याची उधळन माञ आपला मेंदू सतत करतो.त्या उधळनीची सुरूवात चिंता,तणाव,निद्रानाश,उच्च रक्तदाब, पासून ते मानसिक संतुलन बिघडण्या पर्यंत होत असते.या मेंदूच्या रंग उधळनीला माञ थांबवने सहजा-सहजी शक्य होत नाही.

हि रंग उधळण स्पर्श,संवेदना,इच्छा,लोभ,मोह,पासून सुरूवात होते.आणि त्याचा शेवट कधीही सदृढ मानसिक स्वास्थ्याने होत नाही.त्याचा शेवट मानसिक दुःख,वेदना यांनीच होतो.

या मनाच्या अवस्थेचा मेंदूतील रंग उधळनीचा शेवट आनंदाने करण्यासाठी आपल्याला सजगता(माइंडफुलनेस) चे रंग उधळावे लागतील,एकदा या सजगतेच्या रंग उधळण्याची सवय झाली की कोणताही कसलाही रंग मेंदूत उधळूदे त्याला घालवण्याचे काम माञ सजगतेच्या रंगात आहे.

नाही तर आपण अनेक वेगवेगळे रंग लावतो.व ते धुवून घालवण्यासाठी बरेच दिवस सुध्दा जातात तरी त्या  रंगाने आपल्याला घट्ट पकडलेले असते.

असेच रंग मेंदूत उधळले जातात,ते वर्ष आणि वर्ष जाता-जात नाहीत.

या साठी या वेळची रंग उधळन नैसर्गिक रंगाने करूयात,दुष्परिणाम टाळूयात.त्याच प्रमाणे मेंदूत ही नैसर्गिक सजगतेच्या रंगाची उधळन करून दुःख मुक्त,स्वयं-प्रकाशमान,मानसिक स्वास्थ्य रंगाची उधळून करायला शिकून घेऊ.

सजगता रंग उधळन करून ,तणाव,चिंता,निद्रानाश सारख्या मानसिक समस्या असणाऱ्या  रंगाची उधळन आटोक्यात आणायला प्रशिक्षण घेऊयात...

संपर्क-
7066217153
8104643065

राहुल दळवी
माइंडफुलनेस प्रशिक्षक.

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...