Skip to main content

World mental health day

आज १० अॉक्टोबर...
जागतिक मानसिक आरोग्य दिन.

"सजगता जीवनाची गुरुकिल्ली"
"


 आज १० अॉक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन,१९९२ सालापासून वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(Who)ने मानसिक आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रथम सुरूवात केली.तर

जगभरात मानसिक आरोग्य सुधारण्यास व आत्महत्या रोखण्यास बरेच प्रयत्न चालू आहेत.दरवर्षी ८००,००० लाख लोक आत्महत्या करून मरतायत,तर ४५ कोटी लोक मानसिक आजाराशी लढा देत आहेत.सर्व साधारण आत्महत्याचे प्रमाण पाहिले तर ४० सेकंदाला एक आत्महत्या होतात.आत्महत्याचे जास्तीत जास्त प्रमाण पाहिले तर वय वर्षे २० ते ४० वयोगटातील आहे.आत्महत्या प्रमाण ग्रामीण  पेक्षा शहरी जास्त दिसून येत आहे.याचा विचार करता,आपण मानसिक आरोग्य विषयी सजग होऊन आत्महत्या प्रमाण कमी करण्यास प्रयत्न करूया.

वर्ल्ड हेल्थ अॉर्गनायझेशन(WHO)कडून १९९४ पासून प्रत्येक वर्षी एक थीम ठरवली जाते.या वर्षी Mental health promotion and prevent suicide अर्थात  मानसिक आरोग्य जागृती करून आत्महत्या कमी करूया.ही थीम आहे.

आज आपण वर्तमानपत्र,टि.व्ही.न्युज,मिञ-मैञीन,नातेवाईक,तर प्रत्यक्ष कुठे ना कुठे आत्महत्या घडणाऱ्या केसेस ऐकतो/पहातो.हळहळ व्यक्त करतो,याच्या पलिकडे आपण कोणतीही भूमीका घेत नाही.

खरे तर सर्व श्रेष्ठ प्राण्यांमध्ये मणूष्य हा बुध्दीमान प्राणी म्हणून गणला गेला आहे.ज्याला विचार करता येतो,चांगले वाईट याची पारख करता येते.आणि याच गोष्टीमुळे मनूष्य एवढा विचार करू लागला आहे की निसर्गाच्या पुढे पळण्याची जनू काही स्पर्धाच करत आहे.याच स्पर्धात्मक युगात आपल्याला सुख म्हणजे काय हे विसरून,सुखाच्याच शोधात भरकटताना दिसत आहे.जसे एखादी कस्तुरी मृग आपल्या बेंबी जवळ असणाऱ्या सुगंधी ग्रंथीचा शोध संपूर्ण जंगल भर शोधत असते.ते शोधता-शोधता जीवन संपूण जाते पण सुंगध सापडत नाही.अशीच काहीशी फजीती आपल्या बाबतीत झाली आहे.

आपण ते सुख आनंद शोधत असताना,अनेक प्रकारच्या मानसिक विकृतींना जन्म देत असतो.याची सुरूवात छोट्याशा बीजा पासून होते,व जस जसे मोठे होइल तसे काटेरी वृक्षात निर्माण होऊन जाते.त्यातून बाहेर पडण्यात आयुष्य पणाला लागते. या साठी ते बीज कशाचे आहे,त्याचा पुढे उपयोग होईल का? याची माहिती जाणीव असणे फार अवश्यक असते.आपण ही असेच बीज पेरत असतो.चिंतेचे,तणावाचे ते काही अंशी असायला हवी.पण आपण सतत त्याच बीजाची पेरणी करत रहातो.आणि संपूर्ण शेत काटेरी झुडपाने भरून जाते.ते जेवढे काढायला जाऊ तेवढे ञास दायक ही आहे.परंतु काढून झाल्यानंतर ही त्याची पुन्हा वाढ व्हायला सुरूवात होते.कारण ते जो पर्यंत मुळापासून निघत नाही तो पर्यंत पुन्हा-पुन्हा ते रहाणार.आणि कित्येक वर्ष त्या शेतामधून चांगले पिक घेता येणार नाही.आणि आपण कंटाळून ती शेती विकून टाकतो.काहीच शेतकरी असे असतात.की पुन्हा नव्याने मेहनत करून पूर्वी सारखी भुसभुशीत साजेशी शेती निर्माण करतात.

आपले सुध्दा असेच आहे.आपण ही आपल्या मनात चिंता,तणावाची पेरणी करतो ती एकदा नाही तर वर्षे न वर्षे सतत करत रहातो.त्यातून नैराश्य,निद्रानाश,फोबिया,सारखे महाभयंकर वृक्षांची वाढ होते.आणि आपण ही हातबल होऊन आपल्या जीवनाची शेती संपवायला सुरूवात करतो.त्यातील ही एखादा शेतकरी पुन्हा उभा रहातो.व सजगतेने समजून उमजून नव्याने  शेतीची मशागत करतो.

ही मशागत माञ आगोदरच व्हायला हवी होती.बी- यान्यांची पारख व्हायला हवी.त्याचे सदउपयोग व माहिती असायला हवी.आणि ती करण्यासाठी सशक्त सजग शेतकरी हवा! आज  पासून तुम्ही ही आपल्या मनात पेरणारे विचार कसे आहेत,काय आहेत.यांना सजगतेने पहा.जाणा समजून घ्या.आणि त्याची योग्य पेरणी करायला शिका.

आपल्या मनात दिवसाला ६०ते७० हजार विचार येत असतात.ते विचार ही एक मनाची अवस्था आहे.मृगजळा सारखी,सतत येत असतात,जात असतात.त्यांना पहा सजगतेने त्याची नोंद ठेवा.प्रतिक्रिया देऊ नका.प्रतिक्रिया देणे म्हणजे सतत ची पेरणी करणे.ती पेरणी थांबवून जे जसे आहे तसे त्याला त्याला पहा.सवयीने तुमच्या ही मनाची मशागत होईल.हे जेवढे सोपे वाटते तेवढे सोपे नाही.याला प्रयत्नांची सरावाची गरज आहे.यातून तुम्हाला ही सापडेल "सजग जीवनाची गुरुकिल्ली"

अधिक माहितीसाठी संपर्क करा.
अधिक माहिती मिळवा.

-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153

Comments

Popular posts from this blog

 भाग१ माईंडफुलनेस आणि व्यसन *"डिफॉल्ट मोड नेटवर्क" परिणाम व उपयोग*  *डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय?* आपण जेंव्हा कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम करत नसताना शांत बसलो असताना,आपण भूत,भविष्य, काळातील गोष्टींच्या विचार,कल्पना मध्ये सक्रीय होणे म्हणजे (DMN) डिफॉल्ट मोड नेटवर्क होय. याचा परिणाम जेवढा चांगला,तेव्हढाच दुष्परिणाम   *चांगला परिणाम.* आत्मचिंतन करणे, भविष्यातील योजना आखणे, सामाजिक व समाजातील कुटुंबातील नातेवाईक आप्तेष्ट यांच्या बद्दल चांगला विचार करणे,यासाठी महत्वाचा आहे. परंतु जास्त प्रमाणात सक्रिय DMN जास्त प्रमाणात विचार,चिंता, डिप्रेशन  सारख्या मानसिक आरोग्य वाढीसाठी घातक आहे.याचा (ADHD)"अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी" म्हणजे अवधान अस्थिरता आणि अतिक्रियाशीलता विकृती, तसेच Alzheimer's विकार म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे,विचार आणि निर्णय क्षमता कमी होणे,वर्तनामध्ये बदल,सामाजिक कौशल्ये कमी होणे, अशा विकारांशी संबंध येऊ शकतो. अती व्यसनाधीन मित्रांमध्ये याचा खूप धोका जाणवतो,व्यसनी मित्रांमध्ये जास्त विचार करण्याची प्रवृत्ती(चिंता) एकांत राहणे, स्वतःमध्ये केंद्...

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन.सप्टेंबर १०.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन               १० सप्टेंबर    जीवन खुप सुंदर आहे,त्याला आनंदाने जगाता यायला हवे! निसर्ग निर्मित प्राण्यांमध्ये सर्वांत बुध्दीमान प्राणी हा मनूष्य आहे.तरीही तोच आत्महत्याला बळी पडतो.याच्या सारखी भयानक परिस्थिती दुसरी नसेल असे वाटते. आपल्या आजूबाजूला अनेक सरपटणारे व सस्तन प्राणी आपण पहात असतो.माञ त्यातील एखाद्या सापाने किंवा कुञ्या-मांजराने आत्महत्या केली,असे कधी ऐकण्यात आले आहे का? नाही ना.कारण त्यांच्या मेंदूच्या वाढीमध्ये pre-frontal cortex भागाची वाढ झालेली नसल्या कारणाने त्यांना विचार करता येत नाही.चांगले वाईट समजत नाही. तोच pre-frontal cortex चा भाग(मोठा मेंदू)मानवाला निसर्गाकडून देणगी स्वरूपात मिळालेला आहे.त्यामुळेच मानूस विचार करतो,चांगले वाईटांची त्याला पारख कळते.तरीही आपण माञ त्याचा वापर करायला कमी पडतो.नको असणाऱ्या विचारांचे ओझे डोक्यावरती(मेंदूत साठवून)ठेवतो.चिंतन करणे,सोडून चिंता करतो.तणावयुक्त जीवन जगत असतो.त्यातूनच मानसिक समस्या उदभवायला लागतात.आणि आत्महत्या/चिड-चिड,रागासारखे विचार/भावना म...

व्हिज्युअलायझेशन

#कल्पना_ध्यान(व्हिज्युअलायझेशन ) व्हिज्युअलायझेशन  म्हटले की अनेकांच्या मनात एक जादू आसल्यासारखे वाटते.फक्त कल्पना करूण आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी आपले स्वप्न आपण पूर्ण करू अशा भ्रामक समजूती आपल्या समाजामध्ये दृढ झालेल्या आढळून येऊ लागल्या आहेत. एक विचार करा.फक्त कल्पना करण्यांनी आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी मिळवता येतात का?कि त्याला ही प्रयत्नांची जोड द्यावी लागते.जेंव्हा याचे चिंतन कराल तेंव्हा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडल्या शिवाय रहाणार नाहीत. आज अनेक मंडळी,#माईंडफुलनेस कार्यशाळा संदर्भात विचारत असताना.मला #व्हीज्युअलायझेशन हे कितपत उपयोगी आहे का? ते करायला हवे का? आम्ही #द_सिक्रेट हे पुस्तक वाचले,अनेक वेळा या विषयी ऐकले ही आहे.अनेक व्यक्ती यशस्वी झालेत ते कसे काय? #आपण_ते_पाहू_या! आपण दहावी/बारावी ला आहोत.आपल्याला येणाऱ्या बोर्ड परिक्षा मध्ये पास होण्याचे आहे. आणि आपण फक्त अभ्यास करण्याची कल्पना करत बसलो.व प्रत्यक्षात अभ्यास केलाच नाही तर बोर्ड परिक्षा पास होईल की नापास.आपण नक्कीच परिक्षेमध्ये शेवट हून पहिला नंबर काढलेला आसेल.व माञ आपण प्र...